AROGYA VIBHAG GROUP-D BHARTI 2016 | FIELD WORKER BHARTI 2016 | POLICE BHARTI 2016 | MAHADISCOM BHARTI 2016
Search Jobs & Results :


Maharashtra 12th HSC Result 2014

Maharashtra 12th HSC Result 2014 | HSC 2014 Result Maharashtra State

HSC 2014 Result Maharashtra State

Maharashtra Board Results 2014 - HSC, SSC
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE)

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE) is yet to decide on the actual date to declare the Class 12 or HSC results, though sources in the board said students may expect their results to be declared in the last week of the ongoing month. The Maharashtra HSC Results 2014 are the Maharashtra Class 12th Result, Maharashtra HSC Result 2014. The MSBSHSE Class 12 (HSC) Examinations 2014 are scheduled in March 2014. About 1.5 Million students have reportedly registered for the Maharashtra HSC Exams 2014 and now they await their Maharashtra HSC Result and the Maharashtra Board Result 2014.

बारावीचा निकाल महिनाअखेरीस

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत निकाल जाहीर होईल, असे संकेत शिक्षण मंडळातील अधिकारी देत आहेत. उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार, हॉल ति‌किटांमधील गोंधळ यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा प्रचंड चर्चेत राहिल्या. अशा चुका निकालात होणार नाहीत, अशा दावाही बोर्डाने केला आहे.

बारावीच्या परीक्षा यंदा चर्चेत राहिल्या त्या हॉल तिकिटांमधील चुका, उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार अशा अनेक कारणांनी. या वादानंतर सुरळीत झालेल्या परीक्षांचा निकाल वेळेत जाहीर होईल, असा दावा बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे यंदा निकाल ३० मे पूर्वीच जाहीर होण्याचे संकेत बोर्डाचे अधिकारी देत आहेत. त्याची घोषणा लवकरच केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत राज्यस्तरावरील आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. हॉल तिकिटांमधील चुकांमुळे विद्यार्थ्यांना बोर्डाने रडवले. एवढा मोठा गोंधळ ‌बोर्डाच्या इतिहास प्रथमच झाला. त्यातच यंदा सुरुवातीला काही दिवस ज्युनिअर कॉलेजांमधील शिक्षकांचा बहिष्काराचाही मुद्दा समोर आला. त्यानंतर शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला आणि सर्वांना दिलासा मिळाला. या सर्वांचा निकालावर परिणाम होतो, की काय, अशी शंका उपस्थित होत होती. परंतु, तसे होणार नाही आणि निकाल वेळेतच जाहीर केला जाईल, असे मंडळ अधिकारी मेच्या पहिल्या आठवड्यापासून सांगत आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही वेळेत निकाल जाहीर होतील. बारावीचा निकाल मे अखेर तर दहावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, असे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद विभागात यंदा बारावीची एक लाख १८ हजार ९७५ विद्यार्थ्यांनी, तर दहावीला सुमारे एक लाख साठ हजार परीक्षार्थी होते. औरंगाबाद विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून अंतिम निकाल सोमवारी पुण्यातील मंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे बोर्डातील सूत्रांनी सांगितले.
....
मागील वर्षीप्रमाणे यंदा ही निकाल वेळेत जाहीर होईल. बारावीचा मे अखेरपर्यंत निकाल लागलेला असेल. विभागाचे बारावी निकालाचे काम पूर्ण झाले आहे.


No comments:

Contact Us

Name

Email *

Message *

| Copyright © 2013 Recruitment 2015 - MahaCityJobs.com